ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन
आपल्या सेवेस समर्पितऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन (NGO) ही संस्था आरोग्य, शिक्षण, संस्कार व इतर अनेक सामाजिक क्षेत्रात काम करत आहे.कुपोषण, अपंगत्व, आरोग्याविषयी जनजागृती करणे, खाजगी व सरकारी रुग्णालये, मेडिकल, लॅब चालक यांच्या सहकार्याने ग्रामीण व शहरी भागात आरोग्यविषयक शिबीर घेणे, गरजू लाभार्थ्यापर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याचे काम संस्था 'आरोग्यदूत' यांच्या माध्यमातून करत आहे.
समाजातील दानशूरांच्या सहकार्याने रुग्णाला मदत करत त्याच्या उपचारासाठी वेळोवेळी सहकार्य करणे, रुग्णाला वेळेत दवाखान्यापर्यंत पोहोच करण्याचे काम संस्थेचे 'आरोग्यदूत' करत असतात.
व्यसनमुक्ती अभियान राबवत व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करणे, कुपोषण मुक्तीसाठी ग्राम बालविकास केंद्र स्थापन करणे, मतिमंद व कर्णबधिरता नियंत्रण कार्यक्रम राबविणे, ग्रामीण भागात रुग्णावाहीका, बाईक ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे व प्रत्येक तालुक्यात ऋग्वेद योग विद्यालय स्थापन करणे हा संस्थेचा उद्देश आहे.
व्यक्ती आजारी पडल्यानंतर झटपट रुग्णालयात न जाता आजार अंगावर काढण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आजार वाढतो आजाराचे निदान होण्यास वेळ लागतो त्यामुळे उपचारास होणारा खर्च वाढतो. आरोग्य सुरक्षा कार्ड योजनेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेऊन आरोग्याविषयी जनजागृती करणे, शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत अशा ठिकाणी आरोग्य शिबिर घेणे व आरोग्य ही संपत्ती आहे ( Health is Wealth)एक वेळ पैसा संपला तर तो कमवता येईल पण आरोग्य संपलं तर कमवता येत नाही याचे महत्त्व पटवून देण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेचे प्रतिनिधी,संस्थेचे आरोग्य दूध करत असतात गावोगावी वाऱ्या वस्त्यावर ही योजना राबवत असताना योजनेच्या माध्यमातून आरोग्य सुरक्षा कार्ड दिले जाते. आरोग्य सुरक्षा कार्ड धारकांना तालुक्याच्या ठिकाणचे खाजगी डॉक्टर, लॅब व मेडिकल चालक ही बिलामध्ये सवलत देऊन सामाजिक कार्य करत आहेत. सामाजिक बांधिलकी ठेवून डॉक्टर,लॅब व मेडिकल चालक पण समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्हाला सहकार्य करत आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये शालेय स्तरापासून सर्व विषयांचा चिकित्सकणे अभ्यास करायाची सवय रुजविणे, तसेच इ.५वी व इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परिक्षेची तयारी करून घेणे, भविष्यातील स्पर्धा परिक्षांचा पाया मजबुत करणे व मुलांना सक्षम व धाडसी करणे हा परिक्षा घेण्यामागचा उद्देश आहे. हि परिक्षा स्वयंअध्ययनावर असते. प्रश्नसंच मुलांच्या मराठी, गणित, इंग्रजी या पुस्तकावर आधारित त्यामुळे मुलांचा चालू वर्षाचा अभ्यास होण्यास मदत होते.
व्यसनमुक्ती अभियान राबवणे
कुपोषण मुक्तीसाठी ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करणे.
मतिमंद व कर्णबधिरता नियंत्रण कार्यक्रम राबवणे.
ग्रामीण भागात रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स उपलब्ध करून देणे.
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऋग्वेद योग विद्यालय स्थापन करणे.
"आपल्या जीवनात आरोग्य ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे!"
आपल्या किंवा कुटुंबातील सदस्यांना आरोग्यसंबंधी काही समस्या आल्यास आमच्याशी संपर्क करा.